Friday, January 1, 2010

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

...काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

.. मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात............

1 comment:

शैलेश राजपूत said...

नमस्कार.
मी शैलेश राजपूत. माझा 'शब्दांकित प्रतिभा' नावाचा दिवाली अंक आहे. आम्ही आमच्या दिवाली अनकट तरुणांमधील सर्जनता शोधत असतो. तुज्या कविता माला आवडल्या. कृपया माला संपर्क कर. माझा ईमेल एड्रेस आहे
chanakya84@rediffmail.com