कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे
स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे
कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी
कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत
कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे
Monday, January 25, 2010
Saturday, January 9, 2010



पण माला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठावर काही ते येत नाही
अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रित मनाची प्रीत
सगळ्याचा विचार करायचा मला
म्हनुनच अपेक्षा करत राहते
तूच काहीतरी बोलण्याची
खर तर मी ही वाट बघते
तुला प्रतिसाद देण्याची
माजे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कलल्या ना तुला
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही
थोड्स समजुन घे की रे मला..............
वाट पाहतोय तो
अशीच इकदा बसले होते
विचारित माज्या मनाला
सांग असे का घडले की
आठवन त्याची नाही तुला
अजुन असाच ज़ुरतोय तो
क्षनाक्षनाला विजतोय तो
तुज्या प्रीतिचा दिवा लावून
जन्म जन्म ज़लतोय तो
तू मागे परतून बघ
तिथेच उभा आहे तो
तुज्या येण्याची आस आहे
म्हणून वाट पाहतोय तो .....
विचारित माज्या मनाला
सांग असे का घडले की
आठवन त्याची नाही तुला
अजुन असाच ज़ुरतोय तो
क्षनाक्षनाला विजतोय तो
तुज्या प्रीतिचा दिवा लावून
जन्म जन्म ज़लतोय तो
तू मागे परतून बघ
तिथेच उभा आहे तो
तुज्या येण्याची आस आहे
म्हणून वाट पाहतोय तो .....
Friday, January 1, 2010
काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
...काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
.. मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात............
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
...काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
.. मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात............
Subscribe to:
Posts (Atom)