Sunday, June 6, 2010

नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...

पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....

सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....


चांदण्या हासतात... चंद्र खुणावातो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...

कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच पचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...



नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...

Monday, January 25, 2010

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

Saturday, January 9, 2010

पुष्कल्दा ठरवते सांगाव तुला
पण माला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठावर काही ते येत नाही

अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रित मनाची प्रीत
सगळ्याचा विचार करायचा मला

म्हनुनच अपेक्षा करत राहते
तूच काहीतरी बोलण्याची
खर तर मी ही वाट बघते
तुला प्रतिसाद देण्याची

माजे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कलल्या ना तुला
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही
थोड्स समजुन घे की रे मला..............

वाट पाहतोय तो

अशीच इकदा बसले होते
विचारित माज्या मनाला
सांग असे का घडले की
आठवन त्याची नाही तुला

अजुन असाच ज़ुरतोय तो
क्षनाक्षनाला विजतोय तो
तुज्या प्रीतिचा दिवा लावून
जन्म जन्म ज़लतोय तो

तू मागे परतून बघ
तिथेच उभा आहे तो
तुज्या येण्याची आस आहे
म्हणून वाट पाहतोय तो .....

Friday, January 1, 2010

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

...काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

.. मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात............